दिनविशेष २० नोव्हेंबर

दिनविशेष 

दि. २० नोव्हेंबर

■ दिनविशेष 

१. जागतिक बाल हक्क दिन

बालकांच्या वास्तविक मानवी हक्कांवर पुनर्विचार करण्यासाठी दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी जागतिक बाल हक्क दिन साजरा केला जातो. भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य बाल हक्कांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून जगभरात हा दिवस साजरा करतात. बालकांच्या हक्कांनुसार, बालपणात बालकांना कायदेशीर संरक्षण, काळजी आणि संरक्षण देणे अर्थात त्यांची शारीरिक आणि मानसिक अपरिपक्वता प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे

२० नोव्हेंबर २००७ रोजी १९५९ मध्ये बालकांच्या हक्कांसाठी केलेल्या घोषणा स्वीकारण्यात आल्या. बालहक्कांमध्ये जीवन, ओळख, अन्न, पोषण आणि आरोग्य, विकास, शिक्षण आणि मनोरंजन, नाव आणि राष्ट्रीयत्व, कुटुंब आणि कौटुंबिक वातावरण, दुर्लक्ष, गैरवर्तन, गैरवर्तन, मुलांची अवैध तस्करी इत्यादीपासून संरक्षण यांचा समावेश होतो
 
भारतातील मुलांची काळजी आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी, मार्च २००७ मध्ये, भारत सरकारने राष्ट्रीय बाल हक्कांच्या संरक्षणासाठी एक आयोग किंवा घटनात्मक संस्था तयार केली आहे. बालहक्कांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी संस्था, सरकारी विभाग, नागरी समाज गट, स्वयंसेवी संस्था इत्यादींद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात

लोकांना त्यांच्या मुलांच्या सर्व हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी भारतात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय असेंब्लीचे आयोजन केले जाते

◆ जन्म 
 
१. (१७५०) मैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा जन्म

ते तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. त्यांना 'म्हैसूरचा वाघ' असे म्हणत

२. (१९२९) भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचा जन्म

मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळाले

● निधन

१. (१९१०) रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन

ते लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी आणि शिक्षणसुधारक होते. दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून 'वॉर अँड पीस' आणि 'आना कारेनिना' या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे लिओ टॉलस्टॉय यांना महान साहित्यिक मानले जाते. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याच्या उच्च बिंदू मानल्या जातात. लिओ टॉलस्टॉय हे त्यांच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी स्वभावासाठीही तितकेच परिचित होते. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि ते समाज प्रवर्तक गणले जाऊ लागले. त्यांची 'किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू' या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २० व्या शतकातील 'महात्मा गांधी' व 'मार्टीन लुथर किंग' या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला

२. (१९७३) समाजसुधारक, लेखक, वक्ते, पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते

'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' हे त्यांचे पुस्तक फार प्रसिद्ध आहे


३. (१९८४) लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन 

क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी आणि रूमानी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना त्यांनी लिहल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती

४. (१९८९) भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू 'गानहिरा' हिराबाई बडोदेकर यांचे निधन

पुण्यप्रभाव, सौभद्र, विद्याहरण, युगांतर आदी नाटकांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. जनाबाई, सुवर्ण मंदिर, हृदयाची श्रीमंती, प्रतिभा या चित्रपटांतूनही हिराबाईनी कामे केली. ख्याल, ठुमरी, टप्पा, दादरा, तराणा, कजरी, भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, चित्रगीत अशा विविध गीत प्रकारामध्ये हिराबाईं बडोदेकर यांनी आपले स्थान अढळ केले होते. त्यांना गायनहिरा, गानकोकिळा या उपाध्या मिळाल्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर