दिनविशेष ३ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ३ फेब्रुवारी
१. (१८३२) सन १८५७ च्या आधी पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे वीर आद्यक्रांतीकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांचे निधन
ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र लढ्यातील सशत्र क्रांतीचे प्रथम जनक मानले जाते
२. (१९६३) भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म
भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रमुख अर्थतज्ज्ञ होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment